Friday, April 29, 2011

ईति.हास

पु.लंचं व्यक्तिचित्र आणि प्रवासवर्णण हे माझ सर्वात आवडतं साहित्य आहे. काळ कुठलाहि असो आणि माणसं आपण पाहिलेली असोत किंवा नसोत ते जिवंत करण्याचं सामर्थ पुलंच्या लिखानात आहे,
त्यांचा आणि शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्यातिल एक प्रसंग पुलंच्या " गणगौत" मध्ये वाचण्यात आला आणि तो कधि मनावर कोरल्या गेल्या माझे मला समजले अजुन तो आठवला कि पुलंचं उघड्या डोळ्यांनी पहात असलेले दृष्टेपण अस्वस्थ आणि विचार करण्यास भाग पाडते, ते लिहतात.....
’जिवाला झोंबुन जाणारी घटना हा माझा मित्र अतिशय परिणामकारक शब्दातं सांगतो,पण कलावंताचा विलक्षण अलिप्तपणा राखुण ! ताप आपल्याला चढतो थर्मामिटर नुसता तो दाखवुन स्तब्ध होतो ! रायगडावर जिजामाताची उध्वस्त समाधी आहे.पुरंदरे कारणपरत्वे अनेकदा गेले आहेत. परवा गेले त्याची गोष्ट सांगत होते, परमपुज्य मातु:श्री जिजाबाईसाहेबांच्या समाधी पाशी त्यांना कोल्ह्याकुत्र्यांने फाडलेल्या जनावराच्या हाडाचे सापळे आढळले. आणि त्या समाधी वरुन- समाधी कसली ! आमच्या कोडग्या उपेक्षेची साक्ष देणा~या त्या दगडांच्या राशीवरुन एक लांब लचक धामीण सरपटत गेली.हि कथा एकताना मी शहारलॊ. ज्या पवित्र समाधीवर महाराजांचे पृथ्वीमोलाचे अश्रु सांडले असतील तिथुन स्वतंत्र भारतात एक धामीण सरपटत जाते ! प्रतापगडाच्या अफझूलखानाच्या कबरीपूढे किमती उद उसासत असतो ,जाईच्या कळयाची गलफ तिच्यावर चढते आणि जिजामातेच्या समाधिवर हिंस्त्र श्वापदाने फडश्या पाडलेल्या एकाद्या चुकल्या गोवत्साच्या हाडांचा सांगडा पडलेला आढळतो ! बाबा असलं काहि सांगुन जातो आणि मला स्वत:च्या तोंडात फाडफाड मारुन घ्यावे असे वाटते.
                                                   माणसे ईतिहासातुन खरोखरच घेतात स्फुर्ती ? पुन्हा पुन्हा शिवचरीत्र वाचताना वाटते, महाराजांच्या जन्मापुर्वीचा महाराष्ट्र असाच मेल्या मनाचा नव्हता का? डोळ्यात काहुर ऊठतो.

No comments:

Post a Comment