Sunday, May 1, 2011

होता एक भुंगा

फ़ार-फार वर्षा पुर्वीची गोष्ट आहे ,पृथ्वी एवढी सुंदर होती कि खुद्द देवालाही आपला स्वर्गलोक फ़िकावाट्त असे .पृथ्वीवर फिरायला येण्याचा मोह स्वत:ला देवालाही आवरत नसे .अश्याचं एका रम्यवेळी देव आणि त्याची देवी एका वनात विहार करत होते. तेवढ्यात देवीला एका तळ्याकाठी निलकमळ दिसते ,श्रावन मासी सकळ पृथ्वीने हिरवाशालू नेसलेला होता त्यात ते फुल म्हणजे सुवासनीच्या नाकातील नथनी प्रमाणेचं . देवीचा हात त्या निलकमळा कडे गेला पण कमळाने त्याला हात लावयचा अधीकार फ़क्त भूंग्याला दिला होता. त्याच्या सोबतचं ते फुलत असे . आपल्या फुलाकडे येणारा हात पाहून भुंगा खवळला........ त्याने काय करावे ? त्याने चक्क देवीला चावा घेतला आणि हे पाहुन देवराघवला.रसुन मग देवी निघुन गेली मग मात्र देवाने वक्रदृष्टी भुंग्यावर फ़िरवली .देव बोलला ’ आता मी तुला शाप देणार , प्राण तुझा तुझे प्रेमचं घेणार ’त्या दिवसा पासून रोज हे घडत आहे त्या शापाने भुंगा मरत आहे.
होता एक भुंगा ,
गुंजन वेडा वनी
होते सर्व काही ,
काही ना कमी जिवनी .
सर्व काही असुनी ,
तो नेहमी असे त्रस्त
एक अनामिक सुगंध,
त्याला नेहमी करे अस्वस्थ .
कोडे त्याचे त्याला सुटेना,
गुढ या ओढिचे काही सुटेना
किती हि टाळले तरी ,
झूरल्या वाचुन त्याला करमेना .
एक दिवस त्याने सुगंधाचा ,
शोध घ्यायचे ठरवले
त्याही सुगंधाने त्या वेड्याला ,
वनभर फ़िरवले .
सरोवराच्या काठी,
भुंग्याला ते फुल दिसले
सोनेरी ते फुलही ,
प्रियकरास पाहून हसले .
सायंकाळी रम्यवेळी,
त्याचे प्रेम फुलले
उजाड त्या वनी ,
जणु स्वर्गचं अवतरले .
बाहुत घेण्यास फुलाने,
हात पसरवला
भुंगाही आपल्या जिवाच्या ,
मिठीत विसावला .
कैफ त्यांच्या प्रेमाचे,
रातीला चढू लागले
जवळ घेउन भुंग्यास ,
फुल मिटु लागले .
मध्यरात्री जेव्हा भुंगा ,
फुलाच्या मिठीत होता झोपला
शाप त्याला गतजन्मींचा ,
त्याला त्या क्षणी आठवला .
जाणिवेने त्या शापाच्या ,
तो वेडावाकडा तडफडला
प्रत्येक श्वास फुलाचा ,
प्राण त्याचे घेऊ लागला .
मरण त्याचे पाहण्यास ,
खुद्द देवचं समोर आला
त्या जिवघेण्या क्षणीही ,
भुंग्याने एक धुंद कटाक्ष दिला.
त्या घायाळ नजरेने,
देवही वरमला
काय करून बसलो हे ,
म्हणुन तो हि शरमला
लाकडॆ फोडण्यासं ज्याला,
निर्सगाने घडवले
भेदु न शकला फुलास,
मार्ग प्रेमाने अडवले.
इजा न व्हावी फुलास ,
म्हणून पडुन राहीला
प्रितीच्या या पंथी त्याने,
आज जिवही वाहिला .
सकाळी जेव्हा फुलास जाग आली
रम्य त्याची दुनीया धुळीत मिळाली
निष्प्राण देह भुंग्याचा जेव्हा मिठीत होता पडला
सांगू काय जिव फुलाचा तेव्हा केवढयाने आक्रोशला
विश्व त्याचे प्रेमाचे,
एका दिवसात मिटले
कधी नव्हे ते फुल,
देवावर संतापले.
सोनेरी ते फुल कोमेजू लागले
क्षणात त्यानेही प्राण त्यागले
रोज मध्यरात्री देव आपल्या कृतीवर रडतो
धरणी अश्रुंचा सडा सकाळी दवबिंदुत पडतो

……………रंग माझा वेगळा

No comments:

Post a Comment